असं म्हणतात की अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मनुष्याच्या मूलभूत गरजा आहेत. पण आता काळ बदललाय. ह्या तीन गोष्टींव्यतिरिक्त अजूनही बरंच काही आवश्यक झालंय. आता मूलभूत गरजा म्हणजे ज्याच्याशिवाय तुम्ही अगदी जगूच शकत नाही अशा गोष्टी. अहो मग फ़क्त अन्न, वस्त्र आणि घर मिळालं की झालं………? अजिबात नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्याच्याशिवाय तुमचं पानही हलत नाही.
आता अगदी सकाळी उठल्यापासून सुरवात करुया. उठल्यावर सगळ्यात पहिले काय हवं…….अहो Electricity. त्याच्याशिवाय कसा पडणार उज्जेड…..? मग गॅस, मायक्रोवेव्ह ओव्हन, फ्रिज, टिव्ही, फ़ोन, मोबाईल…….. ही यादी भरपूर मोठ्ठी आहे. आता तुम्हीच विचार करा……. जगू शकता का ह्या गोष्टींशिवाय? ह्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट तर राहिलीच. अहो…….असं काय करता….. COMPUTER ! तेही Internet connection सोबत ! आणि तेही DSL ! पटलं ना मनापासून……?
तर झालं काय की…….. आमचं DSL connection काही दिवसांसाठी बंद पडलं. अहो… ‘बास इतकंच…’ काय म्हणता…… इकडे आमच्या अस्तित्वाचा केव्हढा गहन प्रश्न निर्माण झाला होता……! नेट नाही…… मग जिवंत कसे….. असं कितीतरी लोकांनी चिडवून झालं. पण ज्याचं जळतं ना……फ़क्त त्यालाच कळतं ! अहो किती जीवाची घालमेल……! त्यात त्या वैभवनं मायबोलीवर गझलची कार्यशाळा सुरु केली. नेमका हाच मुहूर्त मिळाला त्याला सुद्धा ! अगदी जिवाच्या आकांतानं कसंबसं internet card वापरुन मायबोलीवर जात होते.
हे झालं मायबोलीचं…….तसंच ऑर्कुटचं. आता इतके स्क्रॅप्स वाट बघत असतात रोज……त्यांना कसं नाराज करणार…..? connection लागतंय लागतंय म्हणता म्हणता cut व्हायचं. संभाषणातली सगळी मज्जाच निघून जायची.
याहू, Msn……. सगळं सगळं कसं निपचित पडलं होतं. computer कडे तर अगदी बघवत नव्हतं. केविलवाणा, बापुडवाणा, दीनवाणा……. दिसत होता हो ! जणू काही माझ्याकडे DSL ची भीक मागत होता. कसं आणि काय होत होतं…… ते कसं सांगू तुम्हाला ? त्यात आमचे पतीराज स्पेन ला गेलेले……. म्हणजे छळायला सुद्धा कुणी नाही. लेकीची बारावी सुरु त्यामुळे तीही बिझी तिच्या अभ्यासात. सगळीकडून संकटं कशी अगदी मोका साधून आली. वाईट्ट वाईट्ट गेले हो १५ दिवस.
मग पतीराज आलेत……. आणि २ दिवसात DSL आलं. आणि मग तो आनंदसोहळा वर्णन करण्यासाठी आमच्या कीबोर्ड कडे शब्दच नाहीत. कंपनीचा माणूस जेव्हा connection करुन गेला तेव्हा मला अगदी भरुन आलं. ह्यांनी रोखून धरलं म्हणून बरं……नाहीतर मी त्या माणसाला औक्षण वगैरे करते की काय अशी माझीच मला भिती वाटली. Computer तर अगदी गद्गद् झाला होता. गहिवर दाटला होता त्या स्क्रीनवर……!
आणि मग…… पुढचे ४ तास फ़क्त मी, माझा computer आणि माझं DSL connection ! पतीराजांनी बाकीच्यांना तशी warning च दिली होती. Do not disturb चा बोर्ड पण लटकवून टाकला खोलीबाहेर. जेवण सुद्धा बाहेरुनच. तसा फ़ार फ़ार काळजी घेतो हं माझा नवरा माझी….! हं तर काय सांगत होते……. इतक्या दिवसांचा विरह…… अगदी मनसोक्त हुंदाडून घेतलं सगळीकडे. खोलीबाहेर आले ते अगदी तृप्त होऊनच ! त्या तृप्तीच्या तेजाने सगळ्या घरात अगदी दिवाळीच भासत होती.
म्हणतात ना साधु, संत येती घरा…..तोचि दिवाळी दसरा……. पण आमच्या कडे मात्र म्हणतात DSL येता पुन्हा घरा……तोचि दिवाळी दसरा…… ! 🙂
पुन:श्च हरी ओम् ! करा आता मनसोक्त लेखन आणि वाचन!
लेख बाकी मस्तच जमलाय!विरह भावना यथास्थित प्रकटल्या आहेत.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
प्रमोद देव.
[:D]
अगदी अगदी,नेट शीवाय comp म्हणजे प्राणाशीवाय शरीर का काय, तसं वाटतं मला,च्यामारी आहे तर खरा पण उपयोग काय याचा,
मी तर नेट कट झालं तरी उगाच ५० वेळा चालु करुन बघत असते चुकुन चालु झालं असेल तर [:p]
अगदी अगदी.पण मी काय म्हणतो अगदी नेटाने खिंड लढवलीत तर आपण ह्या नेट साठी. म्हटले झालेतरी काय आहे? आपला आतापता नाही ख्यालीखुशाली नाहि. तर असा घोळ होता. जैसे जलबिन मछ्ली, बिजलीबिन गॅस, मायक्रोवेव्ह ओव्हन, फ्रिज, टिव्ही, फ़ोन, मोबाईल तैसे
वाईट्ट वाईट्ट वाटुन घेऊ नये माणसानी, होते कधी कधी असे.
गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना नवे वर्ष सुखसमृद्धी व भरभराटीचे जावो.