माणसाला सगळ्यात जास्त भिती कशाची वाटत असेल …..मरणाची ?? अं हं……चुकलात…. !! अहो… एकटेपणाची. बाकी कुठल्याही संकटाला तो तोंड देऊ शकतो पण एकटं राहण्याची वेळ आली तर मात्र तो ढेपाळतो. किंबहुना ह्या गोष्टीचा तो विचार करणंही टाळतो.
कधी कधी गोंधळ, गर्दीचा इतका वैताग येतो की असं वाटतं दूर दूर पर्यंत कोणीच दिसायला नको, जवळ असायला नको. एकांत हवा. पण एकांत आणि एकटेपणा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एकांत सुद्धा काही वेळापुरताच हवासा वाटतो. नंतर त्या एकांताचं रुपांतर एकटेपणात होतं आणि मग तो नकोसा होतो. लहानपणी तर आपल्याला कायम कोणीतरी सोबत खेळायला हवं असतं शिवाय आई, बाबा सुद्धा हवे असतात. तरुणपणी आपला चॉईस बदलतो पण सोबत लागतेच. म्हातारपणी तर सोबत गरजच बनते. उतारवयातल्या एकटेपणाला घाबरुनच तर आपण तरुणपणात लग्न, संसार, मुलं, बाळं ह्यात स्वत:ला अडकवून घेतो. सोबत नेहमीच एक सुरक्षिततेची भावना देते…. मग ती कोणत्याही वयात असो.
कुठल्याही आनंदाच्या क्षणी किंवा कुठल्याही दु:खाच्या क्षणी आपण एकटं राहणं टाळतोच. आनंदाच्या परमशिखरावर असतांना सुद्धा तो आनंद उपभोगायला आपल्याला कोणीतरी सोबत हवं असतंच. एकटं आनंदी कसं राहू शकणार ? लॉटरीचं तिकीट लागलं….. खूप पैसे मिळाले…. पण पुढे काय ? त्या पैशाचं सुख कुणाच्या तरी सोबतीनंच लाभेल ना…!! मग ती सोबत कुणाचीही असो. कधी कधी सगे, सोयरे नसले तर माणसं चक्क कुत्री, मांजरी पाळतात. त्यांच्या सोबत आपला आनंद वाटतात. पण एकटेपण टाळतात.
दु:खातही रडायला कुणाचा तरी खांदा लागतोच. खचलेल्या मनाला उभारी द्यायला कुणीतरी लागतंच. आपल्यासाठी कुणीतरी रडणारं असावं असं प्रत्येकालाच वाटतं आणि तसं माणूस मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर झटतो. आपण एकटेच जन्माला येतो आणि एकटेच जातो हे जरी अंतिम सत्य असलं तरी जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आपण कायम सोबतीसाठी धडपड करतो. त्याच धडपडीत आयुष्य संपतं. संसार, संसार म्हणजे तरी काय असतं ? आपण आपल्या लोकांचं विश्व तयार करतो आणि त्यांना आनंद, समाधान देण्यासाठी कष्ट करतो. कुठलंही काम करतांना सुद्धा शेवटी काम झाल्यानंतर कुणीतरी ते बघून पसंतीची पावती देणं हे ही तितकंच आवश्यक असतं. त्यासाठी ही कुणीतरी लागतंच. शारिरीक भुकेसारखी मानसिक भूक पण असतेच आणि ती भूक भागवायला कोणीतरी सोबत लागतेच. एकटेपण खायला उठतं. त्या पायी वेड लागायची पाळी सुद्धा येते. आपण कितीतरी सेलीब्रेटीजची उदाहरणं बघतो. सेलीब्रेटीज कशाला सामान्य माणूसही माणसांचा भुकेला असतो. “माणसात असणं” हेच मुळी नॉर्मल माणसाचं लक्षण मानल्या जातं.
एकला चोलो रे……. हे म्हणायला ठीक आहे. पण आचरणात आणायला तितकंच कठीण आहे. एकटेपणावर उपाय शोधण्याचे आपले सतत प्रयत्न सुरु असतात. पण एका ठराविक वेळेनंतर त्यावर कुणाची तरी सोबत हा्च एकमेव उपाय असतो. एकटं असतांना आपण नेटवर जरी असलो तरी तिथेही आपण माणसंच शोधत असतो. माणूसपण शोधत असतो. माणूस म्हटलं की त्यात कळप आलाच. जनावरंच फक्त एकटी राहू शकतात. एकटेपण म्हणजे भयाण रात्र, एकटेपण म्हणजे रखरखीत वाळवंट ! असं एकटेपण जगात कुणाच्याही वाट्याला न येवो !
छान लिहले आहेस ! खरं आहे, एकटेपणा जीवघेणा असतो.
लेख वाचल्यावर आठवलं मी एकटा कधी असतो बरे ?
ह्म्म…. शक्यतो कधीच नाही.. कारण मी मित्रांच्या सोबत असतो, लॅपटॉप, मोबाईल, साईट, बझ, फेसबुक, ऑर्कुट, मेल जे मिळेल ते साधन पण मी ऑनलाईन असतो. मनातले शेअर करतो. कोणाला चांगले वाटू दे अथवा वाईट ! पण मित्रांच्या सोबतच असतो. नेटवर मानलेली नाती खूप आहेत.. पण फोन मित्र ही खूप आहेत.. ! म्हणून मी नेहमी म्हणतो… भारतातील कुठलं ही शहर माझ्यासाठी अनोळखी नाही.. कोणी ना कोणी तरी तेथे नक्कीच असतो ओळखीचा… 🙂
धन्यु राज 🙂
तू म्हणतो आहेस ते अगदी बरोबर आहे. नेटवरची मानलेली नाती हे सुद्धा आपल्या एकटेपणावरचं औषध आहे. आपण ते जाणूनबुजून करतो अशातला भाग नाही पण नकळत का होईना ते होतं हे मात्र मान्य करायलाच हवं 🙂
तुमची मांडणी[फ़ोटोसह] आणि लेखन छान आहे.
एकटे कोणीच राहू शकत नाही. अगदी जनावरं सुद्धा.
गाई म्हशीचा असतो कळप[माणसांचा नव्हे]
पक्शांचा असतो थवा
माणसांचा असतो समुह.
वैभव धन्यवाद 🙂
जनावरं म्हणजे मला सिंह वगैरे म्हणायचं होतं…ज्यांना कळप आवडत नाही. पण त्यांच्या सोबतही त्याची मादी, बछडी असतातच म्हणा….!
तुमची चुक शोधण्याचा माझा हेतु नाही. तुमचा लेखन विषयाला अनुसरुन आहे
वैभव ,अरे…. चुका काढल्यास तरी हरकत नाही. उलट त्यामुळे सुधारणेसाठी वाव असतो.
खुपच छान लिहिलत एकटेपणावर ….कधी कधी थोडासा एकांत आवडतो मला पण एकटेपणाची कल्पनाही असह्य होते मला , काही वेळातच वेडा होवून जाईन मी एकट राहावं लागल तर……. खरच असं एकटेपण जगात कुणाच्याही वाट्याला न येवो !
शुक्रिया देवेंद्र 🙂
तेच ना…. अरे खरंच वेड लागेल एकटं रहायची वेळ आल्यावर.
मस्त! खूपच छान!
शुक्रिया जानेमन 🙂
Lekhachi mandani sundar. Pan topic shi thodishi asahamati.
ekatepana kahi varshe traas deto. Pan ekada tyachi savay jhali ki mag parat konaachihee sobat nako vatate.
Ha anubhav konala yaavaa ashee ichchha nahi pan itaki bheeti balagoo naye ekatepanaachi.
Ekada ekate panachi savay jhali ki ti chatak ch aste.
Phakt ajaar, vikalangata aali ki dependence yeto, tyachich ulat ya ekatepana priy asalelya lokaanna bheeti vatate.
Aso. Vyakti titakya prakruti. Lkeh manapaasoon lihilaay..
Me phakt tumhi bahudha na pahileli dusari baju dakhavali.
नचिकेत…… तुमचा प्रामाणिक अभिप्राय आवडला. पण मनात मात्र शंका आली….. खरंच एकटेपणाची चटक लागू शकते ?? आजारपण किंवा विकलांगता आल्यानंतरच एकटेपणा नकोसा होत असेल ? इतका माणूसघाणेपणा येण्यासाठी फार काही भोगावं लागलं असेल त्या व्यक्तीला.
लेख मनापासून आणि चांगला आहे.दुसरी बाजू मला जास्त भावली. लेखामध्ये एकटेपणा म्हणजे एकाकीपणा असावा.एकटेपणा सुंदर असुशकतो. एकाकीपण खायला उठते.आपण एकटे असलो तरी एकाकी नसणे आपल्याच हातात असते असे मला वाटते. Being Alone can be a wonderful experience. But Lonely might be sad.
अनघा….तुझ्या म्हणण्याचा विचार केला पण मला असं जाणवलं की तू म्हणतेस तसा being alone हा wonderful experience असू शकतो पण किती वेळ ? काही काळाने तो aloneness loneliness मधेच बदलणार ना !!
छान लिहिले आहे 🙂
धन्यवाद प्रशांत 🙂
एकटेपणा म्हणजे फक्त समाजापासून वा इतरांपासून दूर वा लांब वा अलिप्त रहाणे एवढाच नसू शकतो. खरा एकटेपणा हा फार भयंकर प्रकार आहे व तो फारच क्वचित कोनाच्या वाट्याला येतो.
माणसांपासून दूर राहूनही स्वत:ला कशात तरी व्यस्त ठेवणे म्हणजे म्हणजे एकटेपणा नक्कीच नव्हे. त्या कार्याची वा कशाच्यातरी आधाराची माणसाला नेहमीच गरज असते व प्रत्येकजण जाणते वा अजाणतेपणी ह्या एकटेपणापासूनच पळत असतो. व स्वत:ला एकतर समाजात, कार्यात, वाचनात वा दारूत किंवा आणखी कशात रिझवत असतो.
असो………
फार मोठा व अतिशय महत्वाचा विषय आहे हा….
ज्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने चांगले मांडले आहे. आवडले. 🙂
झंप्या….. धन्यु !! एकदम सणसणीत नाव आहे तुझ 🙂
तुझं म्हणणं पटेश…एकटेपणापासून आपण सगळेच दूर पळतो आणि त्यासाठी स्वत:ला कशात ना कशात गुंतवून ठेवतो. पण त्या गुंतवण्यात सुद्धा आपण कुठला तरी आधार, सोबत शोधत असतोच आणि देतही असतोच.
माझ्यामते आपण रंगविलेल्या स्वतःच्या प्रतिमेला तडा जाईल या भयामुळे एकटेपणा टाळत असतो.
मनोहर…… मला नाही कळला तुझा मुद्दा. स्वत:च्या रंगवलेल्या प्रतिमेचा आणि एकटेपणाचा संबंध कसा काय येणार ?
shabdhchya maifilit apan ekate kase asanar?
kana matra velantichi sobat aste na
kshanbar…
purnaviramche swalpaviramat rupantar karun,
anandachi akhandvakyata tikate na
🙂
लिहिलेलं मनापासून भावले. तुमची बाजू आणि नचिककेतची दुसरी बाजू दोन्ही पटल्या.
पण एकटेपणा आल्याशिवाय आपल्या माणसांची किंमत कळत नाही हे खरे.
ह्म्म….. बरोबर आहे !!
aaple mhan ne thik aahe pan kadhi kadhi ya samjacha itka rag yeto ki ase vat te aapn aani aaple bhale..pan ho he hi khare aahe ki aapn ekte jast vel nahi rahu shakt ..1/2 divas ..typesha jast nahi rahta yet..mag bhale hi te kunachya … dukhat aaso .mala tar khup vela ase vat te ki aapn eaktech aahot..pan internet sobat astech ki facebook,gchat,yadware mi maza time ghalawato..
pan he matra khare aahe ki eakhdya prembhang mansa kadun eakte kase rahayache yaache changle dhade mila tat..asa maza anubhav aahe.
..
…
….
ok my mail id:jawale23@gmail.com
ज्ञानेश्वर…. धन्यवाद !!
majhybarobar majhe gharatle kon jast bolat nahi tyamule mala khup ekte ekte vatate. itke ki majhe kashatach man nahi lagat. me roj net war aste pan sadhe chatting karayla nahi man lagat na kahi vachanyat, kahi kaam karnyat pan nahi. kadhi kadhi tar man khup bharun yete pan konalach sangu shakat nahi ashi awastha jhaliy
अर्पिता, तू सगळ्यात पहिले एकटं रहाणं सोड आणि बोलती हो. तुला सांगू, आपल्या मनातलं कुणाशीतरी बोललं की मन मोकळं होतं गं !! एकटेपण जीवघेणं असतं. त्यामुळे शक्यतोवर माणसांमधे रहा.
khup chan ahe………..
धन्यवाद !!
chan aahe pan yavar upay sangta nahi yenar ko o …….mala kup ykta vat tay
राहुल, प्रत्येकाला हा उपाय स्वत:च शोधून काढायचा असतो !!
lekh changla aahe.
धन्यवाद प्रदीप 🙂
लेख खुपच छान आहे.
खुप लोक असे असतात कि ते एकतेपणात जगतात. त्यांची अशी वेगळी दुनिया असते. काही लोक कल्पनेच्या जगात वावरत असतात ते ही बहुतेक वेळ एकटे असतात. एकटेपण म्हणजे शरीरानेच एकटे असणे नव्हे. काहीजण तर घोळक्यात असुन देखील एकटे असतात. प्रत्येकाचे एकटेपण हे त्या व्यक्तीनुसार वेगळे असते. आणि एकटेपण ज्या व्यक्तीला आवड्तो त्या व्यक्तीला एतर लोक आवड्त नाहीत असे नव्हे. कारण मलाही एकटेपण आवड्तो.
हम्म्म्म …..!! प्रत्येकाची प्रकृती वेगळी, स्वभाव वेगळा….. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला कधीच एका चौकटीत बांधता येत नाही. एकटेपणाचंही तसंच आहे. बेसिकली, मला असं म्हणायचं आहे की एकटेपणा स्वत: निवडणं वेगळं आणि तुमच्यावर लादलं जाणं वेगळं. जेव्हा तुमच्यावर लादलं जातं तेव्हा ते कठीण असतं.
Hi blogsister…..
malahi ekata aavadat nahi tarihi mala lokanmadhye misalata yet nahi. pan tumach article vachlyavar kalal ki chuk mazich aahe. mazehi khup mitra-maitrini aahet pan me jyanchyavar jiv takto te thodech aahet. pan tyana te kalat nahi. mala as vatayach ki te mala avoid karat aahet pan mazya ekekipanachya swabhavamule me swatalach tyanchyapasun dur karat hoto. mazya gharchyanchi pan hich complaint aahe ki me bolat nahi. shant asato. pan it’s ok. gela to past hota. but from now i’ll try to b in touch with my friends and family.
aani ho…tumhi khup chhan lihita….
thank u……
अजय…. धन्यु 🙂
अरे एकटेपण हे तुम्ही enjoy करुच शकत नाही रे……!! छानपैकी सगळ्यांमधे रहावं…. आनंद द्यावा….आनंद घ्यावा. ही तर मजा आहे जगण्यातली….. !!
kadhi kadhi sagle aplya javal asunahi ekate vatate duble vatate hridayatale maze guru prajgopalachari mala sangatat ayushya he asech aahe spiritual journey var apan ase ekatech asto.
लेख खुपच छान आहे.
खुप लोक असे असतात कि ते एकतेपणात जगतात. त्यांची अशी वेगळी दुनिया असते. काही लोक कल्पनेच्या जगात वावरत असतात ते ही बहुतेक वेळ एकटे असतात. एकटेपण म्हणजे शरीरानेच एकटे असणे नव्हे. काहीजण तर घोळक्यात असुन देखील एकटे असतात. प्रत्येकाचे एकटेपण हे त्या व्यक्तीनुसार वेगळे असते. आणि एकटेपण ज्या व्यक्तीला आवड्तो त्या व्यक्तीला एतर लोक आवड्त नाहीत असे नव्हे. कारण मलाही एकटेपण आवड्तो.
hmmm
लेख खूपच छान 👌
नाही खूपच अवघड आहे हे एकटेपण…………
दूर देशीच्या आठवणी
आणि
अश्रुंचे पाट वाहायला लागतात.
जेव्हा असते एकटे मन
आणि त्या अशा आठवणी ज्या
आपल्यापासून दूर असलेली प्रियजन आठवतात
खरंय !
स्टार माझा वरील स्पर्धेत तुम्हाला बक्षीस मीळाल….!
आपले अभिनंदन…….💐💐
धन्यवाद 🙂