आई……..
………
…..
यापेक्षाही जास्त दु:ख असू शकतं ???
पावसाळा आला, पाऊस मात्र नाही
आभाळ भरुन आलं पण कोसळलंच नाही
पावसाचा देव म्हणे रुसला होता
माझं गाव सोडून, बाकी बरसला होता
वेशीपल्याड सारं काही भिजवत होता
मला मात्र मुद्दाम विसरत होता
देवाकडे जेव्हा मी गार्हाणं केलं
तेव्हा त्याने त्याचं भांडार… खुलं केलं
खेळी मात्र पावसाने अशी काही केली
आई माझी आभाळात उचलून नेली
केलं पार पोरकं त्याने भर पावसात
विश्व केलं उध्वस्त फक्त काही क्षणात
बांध फुटला डोळ्यांचा, आवरेना पाऊस
तेव्हा मात्र माझ्या सोबत रडला पाऊस
आता फक्त पावसाळा, दुसरा ऋतू नाही
भिजलं अंग पुसायला आई मात्र नाही
पावसाच्या देवा, पुन्हा असं नको करुस
बदल्यात पावसाच्या कुणाची आई नको नेऊस
जयश्री
😦
अप्रतिम. कविता वाचून डोळ्यात पाणी उभे राहिले.
जेव्हा हे जाणवतं की आता आई फक्त आठवणीतच राहणार त्यावेळी मात्र जीव कासावीस होतो….काही काही सुचेनासं होतं. सगळी सुखं असूनही फार एकटं आणि भकास वाटतं. >>>:(
kaay bolyach g!!
Kahi shad suchat nahiye… Dolyat pani aalyashivay rahat nahi… 😦
खूपच हळवी कविता. हळवं नसलेल्यांनाही हळवं करणारी. छान.
😦 😦
khup chan kavita ahe mavshi…
var ji comment ahe ti me kelie..me shraddha sangeeta taichi mulgi….
श्रद्धा…ओळखलं मी तुला…… !!
आई बद्दल सगळ्यांच्याच भावना इतक्या तीव्र असतात की आईबद्दल काहीही वाचलं की आपोआप डोळ्यात पाणी येतं. त्यात आई आता पुन्हा कधीच दिसणार नाही हे जेव्हा जेव्हा जाणवतं…… त्यावेळी ते पाणी डोळ्यांच्या बाहेर वहायला लागतं… !!
Jayshreetai, tumachyaa dukkhaat mee sahbhagi aahe. maaybolivar aai gelyache vachle hote. 😦
आई बद्दल सगळ्यांच्याच भावना इतक्या तीव्र असतात की आईबद्दल काहीही वाचलं की आपोआप डोळ्यात पाणी येतं. >>>> sahmat aahe. 😦
तुमच्या प्रतिक्रियांना काय उत्तर देऊ….. सावरतेय अजूनही…… इतकंच म्हणेन.
jayashree taa.. mi aae share keli… aata aaplaya doghancha dukha samaan aahe.. ti ye el paratuni punhaa navin janma gheun faktha tujya dolayni tila shodh ti tujaya avti bhavati aahe….
ह्म्म्म……..नितीन…..तू म्हणतोस त्याप्रमाणे वाट बघेन 🙂
jayu,khoop touching.. speachless !!!!!
Arati Deshmukh
आरती……. अगं आई विषयच काळजाला हात घालणारा आहे गं !!
Kharach Chhan ahe…kavita ani aashay suddha.
धन्यवाद जेम्स !!!
Khup chan
dolyat pani alay
निलेश …. मलाही प्रत्येक वेळी वाचतांना रडू येतं !!
khup chan watl
धन्यु प्रिया !!
kaay bolawa kalat nahiye
ह्म्म,,,,,,!!!
Jayshree jyachi aai jate tyalach he dukh kalate, tuzya hya likhanane dolyat pani aale mazya.
अगदी खरं आहे सुहास तुझं !!
kavita vachun dolyat pani aale
शेवटी आई हा सगळ्यांचाच Strong Weak Point असतो ना !!
radawal ho tumhi mala……………..i love my mom 2 much……………janmo janmi parat parat dev tichych poti janm devo hich ichha…………………………..!surekh kavita…………………………….wait dukha.
.
अर्चना……. तुझी इच्छा पूर्ण होवो !!
Jayshree
Khup Khup chan.
dolyat pani alay
JAYU, TU KHUP TALENTED AAHE.
धन्यवाद जयश्री !!
khupac chan aapan doghi samdukhi
वनिता, तुझ्या दु:खाची कल्पना करू शकते गं !!
APRATIM …… AAI SATHI JE KAHI AAPAN MANAPASUN LIHILAT…. KHUP CHAN……. DOLAYAT PANI AANYASARKHE SHABDA AAPLYA KAVITET AAHET
धन्यवाद संजीव !!
जयश्रीताई ,आज खूप दिवसानंतर तुमचा ब्लोग पाहत असताना ‘आई ‘**वाचण्यात आला
आपल्या भावना मी समजू शकतो असे म्हणू का?.
काय योगायोग आहे पहा दिनांक १ ऑगस्ट २०११ रोजी माझे पितृ-छत्र हरपले .सर्वकाही असूनही एक पोकळी जाणवते .माझ्या मित्रांना लिहिताना मी केलेली रचना अशी आहे
प्रिय मित्रवर चंदू,राजू लाहोटी , नंदू परळकर ,बाबाराव राठोड ,दिलीप सोनी यास
माझ्या वडीलांच्या मृत्युनंतर तुम्ही सर्व जण खास आपल्या १० वीतल्या मित्राला भेटण्यास वाशिमहून कारने आलात फारतर ३० मिनटे असाल पण तुमच्या भेटीने मनाला फार शांत वाटले .याच दिवसात निर्मला,जयश्री ,भेलोंडे ,अशोक हेदा असे अनेकांचे फोन आले.सर्वांचेच शोकसंदेश मिळाले त्या पार्श्वभूमीवर हे मनोगत !
देखणा देहांत जो सागरी सूर्यास्तसा!
कवीने व्यक्त केलेली हि भावना थोड्याफार फरकाने आपण सर्वजण अनुभवत आलो आहोत.
तथापि बाबांनी देह सोडला त्याविषयी आपल्या भावना निश्चितच वेगळ्या आहेत.त्या कदाचित शब्दात व्यक्त करता येणार नाहीत पण जाणवल्या हे नक्की.
१/८/२०११,श्रावण शु.व्दितीया सोमवार पहाटेच्या रामप्रहरी केव्हातरी शांत आणि तृप्त मनाने घेतलेला जगाचा निरोप सारेच कसे विलोभनीय .
बाबांची योग्यता,त्यांनी जपलेले जिव्हाळ्याचे संबध त्यांचा आश्वासक सहवास ह्या सर्वांचा वियोग क्लेशदायकच पण तुम्हा सर्वांच्या उपस्थितीने/शब्दाने आमच्या परिवाराचा दु:खभार निश्चितच हलका झाला.आमच्या जीवनपथावरील वाटचालीत बाबांचे आशीर्वाद ,तुम्हा लोकांचे कृपाछत्र आमच्यासाठी मोठेच पाथेय ऋण निर्देश नाही तर आपली मायपाखर अशीच रहावी ह्या आर्तभावनेने हे चार शब्द!
अभय……. तुझ्या संवेदनशील भावना तू इतक्या संयतपणे लिहिल्या आहेस ना…….!! अशावेळी आपण आपल्या लोकांचाच आधार शोधात असतो. अशावेळीच कळतात आपली माणसं !!
Khup mnala bhidnare shabd Ani bhawana ahet. mazi Aai jaun aaj 1 mahina zala . Khare tr aai vina ayush nko zalay , kahich suchatch nai fkt aai . Mnat khup vedna hotat. Apoaap dolyatun Pani yete.. kuth shodhu mazya aaila.. konala sangu.. pn tumchi Kavita vachali Ani Aai chi tivr athvan zali. Mazi vat pahnari mazi Aai
तुमची वेदना समजू शकते… आई तुमच्या जवळच आहे…तिचा आशीर्वाद तुमच्या सोबत कायम असणार आहे